सावकारांना जबर दणका: जिल्हा उपनिबधकांनी २५ वर्षापूर्वीची बळकवलेली जमिन शेतकऱ्यांना केली परत.

सावकारांना जिल्हा उपनिबंधकांचा जबर झटका. पंचवीस वर्षांपूर्वी सावकारीतून बळकवलेली उजनी जवळची सहा एकर जमीन परत मिळणार.सविस्तर वृत्त असे की,सावकारीतून मिळवलेली ९ एकर १४ गुंठे शेत जमीन संबंधित शेतकऱ्यांना परत देण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक कर्तव्यदक्ष अधिकारी कुंदन भोळे यांनी दिले आहेत, त्यामुळे सावकारांचे धाबे दणाणले आहेत. ही सर्व जमीन उजनी धरणालगतची असून करमाळा तालुक्यातील सावकारीचा दहा प्रकरणाच्या निकालात एकाच कुटुंबातील तब्बल सात जण आहेत. पंढरपूर तालुक्यातील शेंडगेवाडी येथील ज्योती पोपट मासाळ यांची ६० आर, कुगाव येथील किसन बापू हवालदार ६२आर, चिकलठाण नंबर दोन येथील अभिमन्यू भिवा सरडे २५ आर , पत्नी सुशीला अभिमन्यू सरडे २५ आर, जगन्नाथ गोविंद बोंद्रे ४० आर, संतोष रामा गलांडे यांची २१ व ८१आर, बबन रामा गलांडे यांची ८१ आर, जेऊर येथील राजकुमार छगनलाल गादिया ९५ चौरस ७ मीटर, करंजे येथील शांताबाई रामकिसन पाटील ४० आर, अण्णासाहेब उर्फ मारुती रामकिसन पाटील ४० आर, जमीन सावकारांच्या तावडीतून सुटली आहे. चिकलठाण येथील विष्णू भानुदास गुटाळ दत्तू भानुदास गुटाळ व संतोष विष्णू गुटाळ या एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध सावकारीचे ७ दावे होते, सर्वच दाव्यात ६ एकर १४ गुंठे तसेच ९५ चौरस ७ मीटर जमीन देण्याचे आदेश झाला आहेत. १९९७ मध्ये कुगावच्या जगन्नाथ बोंद्रे यांनी ४० आर जमीन दत्तू गुटाळ यांना लिहून दिली त्या मोबदल्यात दीड लाख रुपये पाच टक्क्यांनी घेतले होते परंतु ही रक्कम परतफेड न झाल्याने गुटाळ यांनी नावावर जमीन करून घेतली त्यामुळे या शेतकऱ्यांनी सावकारा विरोधात लढा चालू केला आणि सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १८ अन्वये जमीन परत देण्याचे आदेश कर्तव्यदक्ष अधिकारी जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी दिले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला असून सावकारांना या आदेशामुळे चाप बसणार आहे. या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here