गेले 10 वर्ष कुर्डूवाडी शहरातील नामांकित अशी रेल्वे शाळा बंद करण्यात आली होती.ती शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी मा रेल्वे बोर्डाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत .असा रेल्वे बोर्डाने लेखी आदेश मा.जर्नल मँनेजर यांनी काढला आहे. पुन्हा रेल्वे शाळा सुरू होत असल्यामुळे कुर्डूवाडी तील नागरिकांनी व अध्यक्ष कामगार नेते महेंद्र जगताप यांनी पाठपुरावा केला होता.त्याला यश मिळाले आहे . कुर्डूवाडी रेल्वे कारखान्यात बंद केलेले बुनियादी प्रशिक्षण केंद्र पुन्हा चालू व्हावे या साठी मा सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले साहेब यांच्या माध्यमातून हे दोन्ही प्रश्न मार्गी लागत आहे. या मुळे कुर्डूवाडी शहरातील नागरिकांच्या मध्येआनंदाचे वातावरण झाले आहे.