शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात

दौंड(प्रतिनिधी:गणेश खारतुडे)-दौंड तालुक्यातील बोरिएंदी गावातील व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला पुणे -सोलापूर महामार्गावर अपघात झाला. हा अपघात यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत खेडेकर मळा येथे सोमवारी (दि.११) रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
यात एकूण नऊ मुले जखमी झाली आहेत. ७ मुली तर दोन मुलांचा यात समावेश आहे.हे सर्व विद्यार्थी उरली कांचनमधील महात्मा गांधी शाळेचे विद्यार्थी असल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमी विद्यार्थ्यांना उरळी कांचनमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी यवत पोलिसांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे. या अपघातानंतर पुन्हा एकदा शालेय विद्यार्थी वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here