करमाळा शहरातील या भागात बेकायदेशीर सावकारी चा अतिरेक पोलीस प्रशासनाने आळा घालण्याची मागणी.

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहरातील भीम नगर ,सिद्धार्थ नगर ,तसेच अण्णाभाऊ साठे नगर येथे बेकायदेशीर सावकारीने उच्चांक गाठला असून गरीब, असहाय्य लोकांना 10 ते 20 टक्के दराने व्याजदरातुन बाहेर पडणे मुश्कील झाले आहे.काही महिला देखील पोलीस प्रशासनासोबत सलोख्याचे संबंध असल्याचे दाखवून मातंग समाजातील नगरपालिका कर्मचारी यांना लूबाडत असल्याचे दिसून येते.काही दिवसांपूर्वी एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता. तरी पोलिस प्रशासनाने स्वतः चौकशी करून गोरगरीबांना सावकारीच्या पाशातून बाहेर काढावे अशी मागणी निवेदनाद्वारे रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे यांनी केले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की सावकारी करणारी एक महिला पोलिस कर्मचारी व तहसील कर्मचारी यांच्या सोबत चहापाणी करून प्रशासनाशी संबंध असल्याचे भासवून सावकारकी करत आहे त्यामुळे लोक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत तसेच मेहतर म्हणजे भंगी समाज व मातंग समाजाच्या अनेक सफाई कर्मचारी नगरपालिका येथे कामाला असून त्यांना या दहा ते वीस टक्के दरमहा व्याज त्यातून बाहेर पडणे मुश्कील होऊन बसले आहे. विशेष म्हणजे यातील काही कर्मचाऱ्यांची खाते बुक, एटीएम कार्ड,संबंधित बेकायदेशीर सावकारांकडे असल्याचे समजते.पगार आले की हे सर्व व्याज परस्पर काढून घेतात. तेव्हा तोंड दाबुन बुक्यांचा मार सहन करणारा कर्मचारी व गोरगरिबांना सहन करावा लागतो.पोलीस प्रशासनाने गुप्त माहिती काढून या सावकारी पाशातून वाचावावी अशी मागणी देखील या निवेदनात केली आहे. सदरील निवेदनाच्या प्रति उपविभागीय पोलिस अधिकारी माननीय तहसीलदार व माननीय सहाय्यक निबंधक यांना पाठवण्यात आले आहे सावकारांचे दहशतीमुळे त्यांच्याविरोधात कंप्लेंट देण्यास कोणी तयार नाही.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here