इंदापूर शहरातील शिस्तबद्ध व संयमी नेतृत्व तथा भावी नगरसेवक गोरख भाऊ शिंदे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाबद्दल…

अत्यंत गरीब कुटुंबात जन्म आणि त्यातच कुटुंबप्रमुख म्हणून सर्व जबाबदारी हाती घेतल्यानंतर व अनेक संकटांना तोंड देत शून्यातून विश्व निर्माण करण्यापर्यंत मा.नगरसेवक गोरख भाऊ शिंदे यांचा आजपर्यंत झालेला जीवन प्रवास या ठिकाणी मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.इंदापूर शहरातील शिस्तबद्ध व संयमी नेतृत्व तथा सामाजिक कार्यकर्ते मा. नगरसेवक श्री गोरख पांडुरंग शिंदे याचा खडतर प्रवास कसा गेला याची माहिती नुकतीच खुद्द गोरख भाऊ शिंदे यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनेल बोलताना अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये दिली.
गोरख भाऊ यांचा जन्म दि. 05 /07 /1972 रोजी झोपडीत राहणाऱ्या गरिब कुटूंबात झाला एक मोठी बहीण व नंतर चार भावंडे अशा कुटूंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांचे वडिल इंदापूर शहरातील हाॅटेल मध्ये कावडीने पाणी टाकून कष्ट करत सांभाळ करत होते. अशात घरातील कोणीही शिक्षण घेतले नसल्याने आपण शिक्षण घेऊन कुटूंबाची जबाबदारी डोळ्यासमोर ठेवून शिक्षण करत करत हाॅटेल मध्ये काम केले. नंतर सायकल भाड्याने देणे सायकल पंक्चर काढणे पुढे पानटपरी व्यवसायही केला. नंतर रेशनिंग दुकानात कामाला राहिले, घरीच छोटे किराणा दुकान चालू केले असे काम करत करत सन 1987-88 या काळात दहावी ची परिक्षा दिली.परंतु पुढे घरची परिस्थिती नसल्याने शाळा मध्येच सोडून काही तरी करायचे हि जिद्द मनात बाळगूत होती. आयुष्यावर नाराज न होता नेहमी गोरख भाऊंना दोन वाक्य भावली “रोक नहीं सकता कोई,
मन से इतना कहना होगा,
मंजिल को पाने के लिए
कठिन रास्तों पर चलाना होगा.”
आणि याच प्रेरणेतून आयुष्यातील सर्वात मोठी रिस्क घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला.स्वताच्या वडिलोपार्जित शेतात पडस्थळ रोड इंदापूर येथे “राधाकृष्ण अपार्टमेंट” या नावाने सन 2000 मध्ये अपार्टमेंट बांधून इंदापूर शहरातील पहिली अपार्टमेंट स्कीम हाती घेतली. एक नव्हे दोन नव्हे तब्बल पाच बिल्डिंग उभ्या केल्या. आणि इंदापूर तालुक्यात ‘राधाकृष्ण’ हा ब्रँड तयार केला. या ठिकाणी सद्या शंभर कुटुंब राहत आहेत हे करत असताना सामाजिक कार्याची अवड असल्याने शिवसेनेत काम केले. शहरात बर्‍याच वार्डात शिवसेना संघटना उघडण्यात पुढाकार घेतला या कामाच्या जोरावर इंदापूर शिवसेना शहरप्रमुख ही जबाबदारी त्यांनी सांभाळली. पुढे श्रीराम हौसिंग सोसायटी येथे स्वखर्चाने शिवसेना शहर कार्यालय उभे केले. पुढील काळात सन 1995 ला मा. ना.श्री हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या विधानसभेच्या निवडणुक प्रचारात काम केले. या पुढील काळात भाऊंचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना इंदापूर शहर काँग्रेस चे अध्यक्षाची जबाबदारी मिळाली. पुढे इंदापूर नगरपालिका मध्ये स्विकृत नगरसेवक पद मिळाले सामाजिक कामामध्ये कुठे ही कोणत्याही प्रसंगी धाडसाने पुढे होऊन सुखादुखात काम करत राहिले. याच कामाच्या जोरावर अनेक राजकीय पदे मिळाली पुढील काळात सन 2016/17 ला हर्षवर्धन पाटील साहेब यांनी प्रभाग एक मध्ये नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली या काळात तिरंगी लढतीत थोडक्यात पराभव झाला परंतु पुढे न थांबता वार्डात असो व शहरात काम करत राहिले. त्यांचा स्पष्ट व प्रकट स्वभाव असल्याने काही वेळा त्यांना त्याचा तोटा पण होता पण खऱ्याने वागणे त्यांच्या स्वभावात आसल्याने स्वभावाची चौकट कधीही बदलली नाही. गोरख भाऊ व त्यांचे तीन भावंडे हे खूप गुण्यागोविंदाने सध्या राहत आहेत असं म्हणतात ना जब “भाई-भाई में प्रेम पक्की होती है,तो घर की बड़ी ही तरक्की होती है.”
याप्रमाणे सर्व भावंडांना व परिवारांना एकत्रित गुण्या-गोविंदाने नांदवत आदर्श भावाचा रोल त्यांनी चांगलाच निभावत आहेत.त्यांनी हालाकीतून कष्ट करून वीस लोकांच्या कुटुंब प्रमुखाची जबाबदारी ते पार पाडतात सर्व भावंड एकत्रित ठेवण्याचे काम त्यांनी आज तागायत केले आहे.“ना पूछों कि मेरी मंजिल कहाँ है,
अभी तो सफ़र का इरादा किया है,
ना हारूँगा हौसला उम्र भर
ये मैंने किसी से नहीं, खुद से ही वादा किया है.”
असा त्यांचा आजपर्यंतचा जीवन प्रवास…. नुकतेच भाऊंनी वय वर्ष पन्नाशीचा टप्पा पूर्ण केला आहे आणि यामुळेच एक टार्गेट ठेवून यापुढील जीवन जगण्याचा निश्चय केला असल्याने यापुढील काळातही सामाजिक कार्य व गोरगरिबांची सेवा करण्यात कधीही कमी पडणार नाही कारण आज पर्यंत शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी या गोरगरिबांचाच आशीर्वाद मला लाभल्याने गरिबांची सेवा करण्यात मला विशेष आनंद मिळेल असे गोरख भाऊ यांचे म्हणणे आहे.असे फारच कमी लोक असतात ज्यांच्याकडे दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासारख्या गोष्टी असतात.
तुम्ही त्यातलीच एक आहात याचा आम्हाला अभिमान आहे.
तुझ्या या यशाबद्दल व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा अभिनंदन !

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here